
आष्टी (प्रतिनिधी)
राष्ट्रपुरुषांचे विचार कार्य हे समाज रचनेसाठी मौलिक
असतात.साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी तत्कालीन प्रतिकूल
परिस्थितीमध्ये आपल्या साहित्यातून कष्टकरी,गरीब जनतेमध्ये विचारांचे बीज पेरले असे
प्रतिपादन प्राचार्य तथा मुख्याध्यापक रविकांत सुंबरे यांनी केले. आष्टी
तालुक्यातील खुंटेफळ येथील लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य तथा मुख्याध्यापक रविकांत सुंबरे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करीत होते. यावेळी शिक्षक शाळेचे पर्यवेक्षक काकडे एम.एम., वाघमारे
जी.एल., वाळके.जे.यु. , नरवडे पी.के.,थोरवे बी.एस., राकेश बोडखे, विजय जगताप ,
काकडे जे.आर., गुंड.बी.आर ,गोसावी आर.बी.यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन
करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी प्राचार्य तथा मुख्याध्यापक रविकांत
सुंबरे यांनी लोकमान्य टिळक यांची राष्ट्रभक्ती तसेच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे
यांनी साहित्यातून केलेली क्रांती या बाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. यावेळी
विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी दोन्हीही राष्ट्रपुरुषांच्या
कार्यकर्तृत्वावर भाषणे केली.या सर्वांचे शिक्षकांनी कौतुक केले. यानिमित्त जगताप,
वाळके, वाघमारे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रस्ताविक व सूत्रसंचालन
भालेराव ए.जी. यांनी तर वाळके यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या