उत्तम बोडखे आष्टी.
------------------
देशात सध्या नरेंद्र मोदींची सत्ता आहे.मोदी
सरकार हे फक्त आश्वासने देत आहेत पण एकाही आश्वासनाची पुर्तता करत नसल्याचे १०
वर्षाच्या काळात देशातील जनतेने पाहिले आहे.आता जनतेचा महायुती आणि केंद्र सरकारवर
विश्वास राहिला नाही.मतदार त्यांना त्यांची जागा दाखविणार आहेत.आष्टी विधानसभा
मतदार संघातील रोजगाराचा प्रश्न व पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवु.त्याशिवाय मतदार
संघाचा चेहरामोहरा बदलणार नाही त्यासाठी मला तुमची गरज आहे. निवडणूकीत महाविकास
आघाडीचे अधिकृत तरुण उमेदवार महेबुब शेख यांना विजयी करा. महेबुब शेख यांच्या
पाठीशी मी सह्याद्रीसारखा उभा राहील. त्याने जे प्रश्न मांडले ते मी प्राधान्याने
सोडविलच असे आश्वासन देतो.बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी
होणार असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री
शरदचंद्र पवार यांनी आष्टीतील विराट सभेत व्यक्त केला. तर लोकसभेची पुनरावृत्ती
करा.... विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदार संघात एका दगडात तीन पक्षी मारा असे आवाहान
बीड जिल्ह्याचे खा.बजरंग सोनवणे यांनी केले. आष्टी येथे दि.९ नोव्हेंबर रोजी ईदगाह
मैदानात महाविकास आघाडी व घटकपक्षाचे अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ
झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा.बजरंग सोनवणे,माजी
आ.दादाभाऊ कळमकर, रामकृष्ण बांगर,सेवानिवृत्त कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख,राम
खाडे,अॕड.नरसिंह जाधव,डॉ.शिवाजी राऊत,जेष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी,बापुसाहेब
डोके,आष्टीचे तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके,जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते,अमोल
तरटे,तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव,दिपक खोले,गणेश कवडे,महेश थोरवे,सुनिल नाथ,रविंद्र
ढोबळे,गुलाबरव घुमरे,ॲड.रिजवान शेख,डॉ.नदीम शेख, सुभाष राऊत,राहुल काकडे,विजय
गाढवे,मिनाक्षीताई पांडुळे,गणीभाई तांबोळी,माऊली मुटकुळे,तौफिक शेख,जिशान
सय्यद,भैरव चव्हाण, शिवाजी सुरवसे, विजय गाढवे, राहुल काकडे,सतीष मुरकुटे,दिपक खिळे
आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी.कृषीमंत्री शरदचंद्र पवार म्हणाले
की,निष्ठेने काम करणारे महेबुब शेख यांनी आष्टी मतदार संघात एमआयडीसी सुरू करावी व
साखर कारखाना व्हावा हे दोन प्रश्न मांडले पाणी कसे आणता येईल? रोजगार कसा उपलब्ध
होईल ? आपले नागरीकांना बाहेर कामाला जावे लागते किती दिवस बाहेर कामे करायची ?
मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी महेबुब शेख यांच्या पाठीशी मी सह्याद्रीसारखा उभा
राहील,मी जबाबदारी स्वताः घेईल असे आश्वासन देतो रोजगार पाणी कारखाना दिल्याशिवाय
स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी तुमची मदत हवी आहे महेबूब शेख यांना विजयी करा असे
म्हणाले. प्रस्ताविक आण्णासाहेब चौधरी, यांनी केले.यावेळी खा.बजरंग सोनवणे,
रामकृष्ण बांगर,डाॕ. शिवाजी राऊत, मिलींद आव्हाड, जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते,
माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची भाषणे झाली. पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे
म्हणाले की,माझ्या बहाद्दर मतदार बांधवांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भल्याभल्यांना
पाणी पाजलयं माझ्यासारख्या ज्याच्या घरात कधी ग्रामपंचायत सदस्य नाही,खासदार नाही,
आमदार नाही,जिल्हा परिषद सदस्य नाही अशा एका शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्या आमच्या
सर्वांच्या मुलाला पवार साहेबांनी देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी उमेदवारी
दिली. तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले.आता सर्वांची जिम्मेदारी तुमची आमची आहे की,
महेबुबला विधानसभेत पाठवायचं आहे तर आताच्या काळात बघा लोकसभेची परिस्थिती यावेळेस
धनगर समाजाचे नेते शिवाजी राऊत आपल्यासोबत आलेत आत्ताच रामकृष्ण बांगर यांनी प्रवेश
केला.विविध समाजाचे घटकाचे सर्व समाजाचे लोक आता बरोबर आहेत.ओबीसी मराठा वाद कुणी
लावायचा प्रयत्न केला तरी अस होणार नाही कुणाला वाटतं मी दादागिरीवर निवडून येतो
कुणाला वाटत ओबीसीच्या जिवावर मायबाप जनता तुम्हाला कुठेही माफ करणार नाही आपला
उमेदवार नक्कीच निवडून येणारे मला भरपूर काही बोलायचं आहे.शेतकऱ्यांसाठी या सरकारने
काय केलं तर काहीच नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल धार्जिन सरकार नाही आपल्या इथे
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही कांद्याला भाव नाही उसाला भाव नाही शेतकऱ्याला
हमीभाव देतो म्हणून आता सोयाबीन सांगितलं या सर्व गोष्टीचा रोष शेतकऱ्यांच्या मनात
आहे शेतकऱ्याला धार्जिन नसणारे सरकारने या सरकारचं फक्त जुमले बाजी करणे काम आहे.या
सरकारने आपल्याला काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळे सरकार घरी पाठवायचं काम पवार
साहेब करणार आहेत.
मी पण तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी आणण्यासाठी या
विधानसभा मतदारसंघात जिम्मेदारीने सांगतो साहेबांच्या आशीर्वादाने एक नवीन साखर
कारखाना उभा करू असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो पाणी साहेब देतील कारखाना आपण
सर्वजण उभा करू आणि यापुढे सुद्धा प्रश्न राहणार नाही माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न
मिटला पाहिजे माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळाला पाहिजे ही आपली सर्वांची
जिम्मेदारी आहे राजकारणात पद कशाला असतात तर काम करण्यासाठी असतात कुणाच्या आडवा
आडवी जिरवा जिरवी करण्यासाठी नाहीये. एक दगडात तीन पक्षी मारा असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासाहेब चौधरी यांनी केले तर आभार राम खाडे यांनी
मानले.
क्षणचित्रे
*******
*राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी यांचे
पवारसाहेब यांच्यासमोर धडाकेबाज भाषण झाले.
*तुमच्या मुलासारखा,भावासारखा,
मित्रासारखा समजून मतदानरुपी आशिर्वाद देऊन संधी द्या असे उमेदवार महेबुब शेख
म्हणाले.
* पवारसाहेबांनी मला संधी दिली आमदारकी आपल्या माणसातील जीवनमान
उंचावण्यासाठी असते मागिल ५० वर्षात एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला नाही एकही
कारखाना नाही.आमदारकी टक्केवारी साठी व खोटे गुन्हे,देवस्थान जमिनी,दहशत दादागिरी,
बोगस बील,पंचायत समितीतील विहिरीचे पैसे खाण्यासाठी नसून यामुळे लोकांचा राजकारणावर
भरोसा नाही असे महेबुब शेख म्हणाले.
*उमेदवार स्वताः महेबुब शेख यांनी पवारा साहेब
यांच्या नावाने घोषणा दिल्या. *फक्त कागदावरच होतातयत,कोण किती पाण्यात मला माहिती
निवडणूक कामावर जिंका तुम्ही लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका हुकूमशाही निवडणूक होत
नसती.
*पाच वर्ष फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ
देणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही एवढं चांगलं काम करेल एवढा
विश्वास देतो असी भावनिक साद मतदार बांधवांना उमेदवार महेबुब शेख यांनी घातली.
*आमदारकी लोकावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी,देवस्थानच्या जमिनी खाण्यासाठी,दहशत,
दादागिरी,गुंडगिरी,पंचायत समितीच्या विहिरीत पैसे खाण्यासाठी नाही असे महेबुब शेख
म्हणाले.
*तुम्ही कीती पाण्यात आहात हे माझ्याईतके कुणालाच माहित नाही असे महेबुब
शेख धस यांना उद्देशून म्हणाले
-----------------------------
0 टिप्पण्या