Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक ऊर्जा स्रोत -------माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड..

 

  


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचाराने महाराष्ट्रातील लोक प्रभावित झाले असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार येणार यईल कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पवार साहेबांचे विचार पोहोचण्याचे काम करावे प्रत्येक कार्यकर्ता हा पार्टीसाठी महत्त्वाचा असतो पवार साहेबांनी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा ऊर्जास्रोत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडा संघटक माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आष्टी येथे बोलताना सांगितले .
     आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात आष्टी,

पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आ. बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी युवक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले ज्येष्ठ नेते हरिभाऊ दाहातोंडे, परशुराम मराठे ,महादेव महाजन , गोरख जगताप ,महादेव डोके त्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी बोलताना आष्ट पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य जनतेची पार्टी असून आज पर्यंत पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोकांनी पवार साहेबांना साथ दिली आहे येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सुवर्णकाळ राहणार असून प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे यासाठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे लवकरच आपण मतदार संघात संपर्क दौरा सुरू करणार असून जयसिंग काका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत येणारे वर्षे हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागणे गरजेचे आहे सर्व स्तरावरील निवडणुका आपल्याला जिंकायच्या या उद्देशानेच आपण आतापासूनच कामाला लागले पाहिजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाची ऊर्जा असते कार्यकर्त्याच्याच्या जीवावरच प्रत्येक निवडणुका लढल्या जातात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपला पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागात प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सांगितले.पुढे बोलताना माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आपण भेटी घेणार आहोत उमब्रा ओलांडून घरात गेल्याशिवाय आपल्याला कार्यकर्त्यांची जवळीक साधता येत नाही कार्यकर्ता हा पार्टीचा प्राण असतो त्यामुळे कार्यकर्ता टिकला तरच पार्टी टिकत असते प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी संपर्क अभियान राबवावे जेवढा संपर्क जास्त तेवढी पार्टी वाढण्यास मदत होते पवार साहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे काम राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले पाहिजे तरच येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणूक आपल्याला सोपे जाईल कोणाशी विरोध करण्यापेक्षा प्रेमाने त्याच्या जवळ जा तो एक ना एक दिवस आपला होईल आणि आपला झाला की पार्टी आपोआप मोठी होत असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी युवक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, जेष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे , परसराम मराठे,जग्गनाथ ढोंबळे,गोरख आण्णा जगताप, महादेव महाजन,आजिनाथ गळगटे,महादेव डोके, संतोष गुंड, बाळासाहेब पिसाळ,पंडित पोकळे, जालिंदर गायकवाड, राजेंद्र जंरागे,दिलिप चव्हाण,बबनराव डोके, विठ्ठल नागरगोजे, विठल भवर,सुरेश तात्या अस्वर,अदिनाथ फसले, गोल्हार मुकादम, अंकुश तळेकर,उध्दव भोसले, बाळासाहेब मिसाळ,शामराव फसले, बबनराव रांजणे,बाळासाहेब महाडिक, सदाशिव मिसाळ, म्हतारदेव गर्जे, संतोष खिळे,पंडीत करांडे अक्षय हळपावत,ताराचंद कानडे,सोले मेजर,सुनील खेडकर सतिष सोले, दिलीप तांदळे संभाजी तांदळे, अजिनाथ घुले, सुभाष चव्हाण, बाबासाहेब पुणेकर सुभाष लांबडे,विठ्ठल अडसरे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या