Ticker

6/recent/ticker-posts

शहीद भगतसिंग यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा .......... प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ







 आष्टी (प्रतिनिधी) 

रिपाइंचे नेते केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांचा ५ आक्टोबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल भव्य दिव्य सत्कार होणार आहे.या सोहाळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइंचे नेते उपाध्यक्ष अरुणभैय्या निकाळजे यांनी केले.
    गायरान जमीन गायरान धारकांना सातबारा मिळण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार  आहे.कडा शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याच्या मध्येभागी बसवावा ही मागणी आहे  त्यावार निर्णय होऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.रमाई घरकुल रक्कम ५ लाख रुपये करण्यात यावे,दलित विद्यार्थीच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी,संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यांची रक्कम ३ हजार रुपये प्रतिमहीना करण्यात यावी या मागण्या  ना.आठवले यांच्यासमोर करण्यात येणार आहेत.रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष व युवक प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा होत आहे.आरपीआयचे कार्यकर्ते व सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांनी,भिमसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, उपाध्यक्ष अरुणभैय्या निकाळजे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या